Wednesday 22 November 2023

National Conference on ‘Media at the Crossroads: Balancing Human and Artificial Intelligence’ scheduled on Ja

Abstracts invited for TMV-JMC National Conference 2024 titled ‘Media at the Crossroads: Balancing Human and Artificial Intelligence’ scheduled on Jan 8 and 9, 2024.

Every new invention in communication technology sparks engaging discussions and fierce debates about how they will impact the media. Commonplace uses of artificial intelligence and data-driven content strategies have become the order of the day. They need close scrutiny to fully comprehend how earlier practices that depended largely on human intelligence will be affected by the new technologies. The impact will be felt not only in the process of content creation but also in media business, personnel management and media education. The use of AI will also have to be studied from the audience's perspective.

However, at present the discussion about the impact of AI may be somewhat speculative in nature, as it is an evolving process and the results have not fully presented themselves.  Therefore, a scrutiny of contemporary media (of the pre-AI era) also is of significant academic interest. Research that documents the current practices will be of great value for comparative studies in the future.

TMC-JMC National Conference 2024 will provide the perfect platform to industry professionals, media educators and researchers to share their observations and insights.

 With the aim to balance the past, present and future media activities the conference will feature experts who will explore the central theme of the conference ‘Media at the Crossroads: Balancing Human and Artificial Intelligence’ from several angles.

Media educators and researchers will get the opportunity to present their research before peers and engage in stimulating academic dialogue.

Abstracts are invited for the topics below (but not restricted to them)

Artificial Intelligence: technology and its usage in media; comparison with human-generated content; potential and risks; impact on manpower; cause of a new divide?

Journalism:  emergence of data journalism; data-driven content creation; tackling fake news

Entertainment: post-COVID trends; OTT vs traditional cinema; trends in sports coverage; gaming and AI

Advertising: consumer-targeting through data analytics; influencer marketing; customisation; use of VR and AR in advertising

Media for development: application of technology for development communication; use of data;

Social media: the ‘X’ factor; fake identities and BOTs

Language: using machine translation tools; influence on language

Note: Studies pertaining to Indian language media and understudied audiences are especially encouraged.

Important dates:

Submission of abstract: Nov. 25, 2023

Notification of acceptance: Dec. 8, 2023

Submission of full paper: Dec. 31, 2023

Conference dates: Monday, Jan 8 and Tuesday, Jan. 9, 2024

at Tilak Maharashtra Vidyapeeth, Mukund Nagar, Pune.

Details of registration can be found in the poster and brochure attached.

 further queries, write to me or call Kimaya Mehata (9637112133).

Regards,

Prof. Dr. Ujjwala Barve

Dean, Tilak Maharashtra Vidyapeeth

Pune

ujjwalabarve@gmail.com  

Monday 20 November 2023

"अतिशय सोप्या, रंजक पद्धतीने लिहिलेले पुस्तक"

“पॉडकास्टिंग हे एक असे माध्यम आहे ज्यात तुम्ही लोकानुनयाचा  विचार न करता आपल्या आवडीचा विषय घेऊन त्याबद्दलचे पॉडकास्ट करू शकता आणि घवघवीत यश संपादन करू शकता. 

ते कसं करू शकता, त्यासाठी काय तयारी हवी,  कोणती  उपकरणं गरजेची आहेत या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील, या पुस्तकाची मला सगळ्यात भावलेली  गोष्ट म्हणजे ते अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने लिहिले आहे. भाषा सोपी वापरली की आपोआपच 'हे मला  जमेल' असा आत्मविश्वास वाटतो. काही अतिशय  व्यावहारिक सूचनाही या पुस्तकात दिलेल्या आहेत. हे माध्यम समजलं आहे. अशा अनुभवी लेखकांनी हे पुस्तक लिहिलं  आहे, ही या पुस्तकाची आणखी जमेची बाजू आहे. उज्बला बर्वे  आणि नचिकेत क्षिरे या दोघांनी 'माध्यम संशोधन संवाद  आणि 'इन्स्पिरेशन कट्टा' सारख्या यशस्वी पॉडकास्टची निर्मिती  केली आहे.”

कौशल इनामदार 


Friday 15 September 2023

The Changing Mediascape: Boook By BRP Bhaska

https://docs.google.com/document/d/1kq8FcMbsSi-EXpOSEkXEqtyBzJT405hVnFPKwMgN9LI/edit?usp=sharing

Monday 31 July 2023

पत्रकार ज्यो पिंटो यांचं निधन

पत्रकार ज्यो पिंटो यांचं निधन 

एखादी गोष्ट करायचं आपण ठरवतो पण ते राहून जातं. त्याचा पश्चाताप नंतर आयुष्यभर  होत राहतो. नंतर हळहळ वाटत राहते, पण त्याचा काही उपयोग नसतो. हा अनुभव माझ्या शहात्तर वर्षाच्या आयुष्यात दोन चार वेळा आला आहे. तशीच वेळ आज पुन्हा  आली आहे यावेळी मात्र मी  स्वतःला माफ करू शकणार नाही. 

माझा पत्रकार मित्र आणि सहकारी जोसेफ एम पिंटो आमचा सगळ्यांचा “ ज्यो”  काल   २९ जुलै ला पहाटे खूपच अनपेक्षितपणे देवा घरी गेला. खूप प्रेमळ सहृदय, कोणालाही कधीही कोणत्याही कारणाने त्याने दुखावले, कोणावर तो रागावला असे आमच्या कोणाच्या अनुभवविश्वात घडलेले आठवत नाही. अगदी अलीकडे तो आणि त्याची पत्नी डॉ कल्पना जोशी पत्रकारनगर मधील आमच्या इंद्रायणी बिल्डिंगमध्ये डोकावून तो गेले. कुणाचं तरी आजारपण होतं , कोणाची नात आजारी होती, दुसरं कोणीतरी चांगल्या मार्कांनी पास झालेले होतं   तिचं कौतुक करायला दोघं सहज म्हणून, फोन करून येऊन गेले होते.  अशाच एका त्यांच्या विजिटमध्ये त्यांनी ज्योचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं पुस्तक " लेसन्स ऑफ माय मम्मी  लर्नड  मी" ( "Lessons My Mummy Learned Me") देऊन गेला होता. त्याच्या आईवर लिहिलेलं हे पुस्तक खूप हृदयस्पर्शी आहे असे आमच्यातला एकाने अगत्याने मला सांगितलं देखील होतं. किरण, नक्की वाच आणि कसं  वाटलं ते लिहून पाठव असं  त्यानं मला आग्रहानं सांगितलं होतं. मी “नक्की वाचतो” असं  मनापासून त्याला सांगितलं होतं .  पण माझे वाचायचे राहून गेले होते हे खरं. दुसरं काहीतरी वाचत होतो, थोडं बहुत लिहित होतो. त्यामुळे नाही जमलं. पण वाचायचं मात्र माझं ठरलं होतं. ते झालं की पुस्तक परिचय किंवा परीक्षण लवकरच लिहायला सुरुवात करणार होतो. पण निरोप आला आणि ज्यो  गेल्याचे  कळलं.  आता लिहायला घेतले ते पुस्तकाचा परिचय किंवा परीक्षण असे नाही तर या मित्राला श्रद्धांजली देण्यासाठी.

सकाळपासून जेवढे फोन झाले ते अशीच सुरुवात करीत. स्वर गद गद झालेला. अनेकांनी माझ्यासारखंच त्याचे हे पुस्तक वाचलेले नव्हते. परंतु ज्यो किती सज्जन होता,  “जंटल”मन होता असाच सूर सगळ्यांचा. अशाच साऱ्या आठवणी. 

ज्यो  ची माझी ओळख झाली तेव्हा तो त्यावेळच्या पुणे हेरॉल्ड या दैनिकात उपसंपादक म्हणून काम करू लागला होता . युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेचा मी बातमीदार आणि मॅनेजर म्हणून काम करीत असे. माझ्या कामाचा एक भाग म्हणून मी अधून मधून त्यांच्या कार्यालयात चक्कर मारीत असे. आमच्या प्रतिस्पर्धी वृत्तसंस्थेच्या पी टी आय च्या  बातम्या पेक्षा आमच्या बातम्या सोप्या भाषेत लिहिलेल्या असायच्या. माझ्या स्वतःच्या बातम्या देखील चांगल्या  लिहिलेल्या  असतात हे तो आवर्जून सांगायचा. 

पुण्याच्या कॅन्टोन्मेंट च्या बातम्या मी कव्हर कराव्या अशा आहेत असं त्याला वाटलं तर अजून मधून फोन करून सांगायचा. त्याचे उपसंपादनाचे कौशल्य,  त्त्याने दिलेल्या हेडलाईन्स चे मी कौतुक करत असे.  त्याच्या लेखांमध्ये मला काही इंटरेस्टिंग वाटले तर मी फोनवर सांगत असे.  थोडक्यात, “ अहो रुपम अहो ध्वनी असा प्रकार” होता.

काही दिवसानंतर मला खरंच अनुभवायला यायला लागलं की त्याची इंग्रजी भाषा आणि व्याकरण खूप छान होतं. तो संपादन देखील नीटकेपणाने करत असे.  म्हणून मी त्याला आग्रह धरला की रानडे इन्स्टिट्यूट आमच्या पत्रकारितेच्या कोर्स  ला  एडिटिंग हा विषय शिकवायला ये.
आपल्याला शिकवण्याचा काही अनुभव नाही हे त्याने खूप सांगितलं, पण मी मागेच लागलो.  तसं त्याने माझं म्हणणं मान्य केलं.  काही महिन्यातच तो विद्यार्थ्यांचा अतिशय लाडका शिक्षक बनला.  महाराष्ट्र हेराल्ड मधील नोकरी सांभाळत त्याने रानडेच्या विद्यार्थ्यांना खूप आपलंसं करून टाकलं.  मी विभाग प्रमुख असताना माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक मेळावा घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याची विद्यार्थीप्रियता लक्षात यायला लागली.
“आपल्याला टीचिंग प्रोफेशन मध्ये किरण ने आणलं हे तो अनेकदा म्हणत असे. अर्थात हा त्याचा मोठेपणा होता.  त्याचे इंग्रजी भाषा विषय आणि संपादनाचे कौशल्य हे त्याचे स्वतःचे होते. त्याचे क्रेडिट मला देण्याचे आणि मी ते घेण्याचे काही कारण नव्हते ही वस्तुस्थिती आहे.
आपल्या पूर्व आयुष्याविषयी आम्ही दोघेही फारसे कधी बोललो नाही. तशी वेळ आली नाही. 

केव्हा तरी खूप तरुणपणी आपण खेड्यातील आणि झोपडपट्यांमधील सेवाभावी सामाजिक संस्थांमध्ये काम केले होते असे सांगितले होते. पण त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता हे मला आठवतं .  

आपल्या सेवानिवृत्तीनंतर त्याने पुण्यातील मराठी पत्रकारांना देखील शिकवायचा उत्साह दाखवला.  स्वतःचे सिलॅबस तयार केले.  मराठी पत्रकारांना इंग्रजी लिहायला प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनातील भीती घालवून त्याने अनेक जण त्यात तयार केले त्यांची तयारी पाहायला तो माझ्यासारख्याला आग्रहाने बोलवायचा. खूप आनंद वाटायचा.

या काळात त्याने इंग्रजी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. किती विषय त्याने  हाताळले असतील याला गणतीच नाही. यातूनच त्याने आपली आई अमी पिंटो   हिने आपल्याला कसं घडवलं या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्याचं पुस्तक तयार झालं.  ते वाचायला त्याने अलीकडेच माझ्यासारख्यांना दिलं. ते वाचायचं राहून गेलं. 

त्याची प्राध्यापक पत्नी डॉ कल्पना आणि मी वेगवेगळ्या वर्षी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात होतो. त्यांनी फिजिक्स विषय लहान शाळकरी मुलांना प्रयोगाच्या माध्यमातून शिकवण्याचा वसा घेतला होता. त्या उपक्रमात  माझा मोठा मुलगा नचिकेत होता  ज्यो चे आणि डॉ कल्पना यांचे नाते हे मला खूप नंतर कळले.  त्यांची मुलगी पल्लवी आणि जावई तेजस आणि नातू आर्यन  यांचा देखील परिचय नंतर झाला.  
आजोबा ज्यो  आणि नातू आर्यन  यांचे मधुर संबंध फोनवरच्या संभाषणातून खूप  हृद्य वाटत असत. पत्रकार नगरच्या शेजारी आपण राहायला येण्याचा प्रयत्न करत आहोत हे देखील त्याने मला सांगितले होते. पण आमचा हा मित्र आणि स्नेही आता खूप लांब निघून गेला आहे. परत न भेटण्यासाठी. 

प्रा डॉ  किरण ठाकूर 





 

 प्रा डॉ किरण ठाकूर



Sunday 30 July 2023

Friday 7 April 2023

आयुर्वेद आधारित वनस्पती रोखतात कर्करोग उपचाराचे दुष्परिणाम

 आयुर्वेद आधारित वनस्पती रोखतात कर्करोग

उपचाराचे दुष्परिणाम


पुणे विद्यापीठातील पी. एच्. डी. संशोधन
पुणे, एप्रिल ०७, २०२३- अश्वगंधा आणि शतावरी या सारख्या आयुर्र्वेदिक औषधांच्या सेवनाने कर्करोगाच्या केमोथेरपी उपचाराचे दुष्परिणाम रोखता येतात, हे उंदरांवर केलेल्या संशोधनाने अलीकडेच सिद्ध झाले आहे. सदर संशोधन पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागातील प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. कल्पना जोशी आणि वैद्य गिरीश टिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आकाश सग्गम यांनी पी. एच्. डी. अभ्यासांतर्गत केले. हे संशोधन सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया येथे डॉ. सुनिल गैरोला आणि डॉ. मनिष गौतम यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले.
या प्रयोगाचे उद्दिष्ट कर्करोगाच्या उपचारातील मुख्य दुष्परिणाम ‘मायलो-सप्रेशन’ यावर केंद्रित होते. हाडांच्या गाभ्यातून पांढऱ्या पेशी निर्माण होण्याची क्षमता लोप पावण्याच्या प्रक्रियेला मायलो-सप्रेशन असे म्हणतात. या पांढऱ्या पेशी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीचा अविभाज्य घटक असतात. उलटपक्षी, आयुर्वेदातील ‘रसायन’ संकल्पना शरीराची रोगप्रतिकारशक्ती इष्टतम राखण्यास मदत करते. या संकल्पनेला दुजोरा देणाऱ्या अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पती मानवी शरीरात उत्तम रोगप्रतिकार करतात, हे विविध संशोधनातून सिद्ध झालेले आहे. डॉ. आकाश व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वनस्पतींच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा उपयोग उंदराच्या मायलो-सप्रेशनला रोखण्याकरता केला.
या प्रयोगात कर्करोगाच्या उपचारात नेहमी वापरल्या जाणाऱ्या पॅक्लिटॅक्सेल नामक औषधाने उंदरामधील मायलो-सप्रेशन उत्पन्न केले गेले. त्यानंतर अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पतींच्या अर्क सेवनाने हे मायलो-सप्रेशन यशस्वीपणे रोखले गेले. पॅक्लिटॅक्सेल औषधामुळे प्राण्यांमध्ये दिसून आलेले इतर दुष्परिणाम उदा. थकवा, सांधेदुखी, आणि केसगळती यांनाही अश्वगंधा आणि शतावरीच्या अर्क-सेवनाने आळा बसल्याचे दिसून आले. या संशोधन प्रकल्पास भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे अर्थसहाय्य मिळाले. या संशोधनाचे सर्व निष्कर्ष फ्रंटीयर्स इन फार्माकॉलॉजी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. (अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा). सदर पी. एच्. डी. प्रकल्प हे शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या यशस्वी सहयोगाचे उत्तम उदाहरण आहे.
डॉ. आकाश यांनी आपल्या मुलाखतीत कर्करोगाच्या उपचाराचे दुष्परिणाम रोखण्याच्या आयुर्वेदाच्या क्षमतेला अधोरेखित केले. “या संशोधनाने आयुर्वेदातील रसायन संकल्पनान्वये राखल्या जाणाऱ्या प्रतीकारक्षमतेच्या समतोलास वैज्ञानिक पुष्टी दिली. ह्या संशोधनाचा पुढील टप्पा प्रत्यक्ष कर्करोगाच्या रुग्णांवर रसायन संकल्पनेचा स्वास्थ्यकारक उपयोग असू शकतो”, असे त्यांनी नमूद केले.
आयुर्वेद, कर्करोग विज्ञान, रोगप्रतिकारशक्ती, आणि माहिती तंत्रज्ञान यातून साकारणारी एकात्मिक स्वास्थ्यप्रणाली हे डॉ. आकाश यांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत. या संशोधनाने समग्र आणि आंतरविद्याशाखीय उपचारपद्धतीचा जागतिक कल अधोरेखित झाला आहे.
पी. एच्. डी. संशोधन:
डॉ. आकाश सग्गम
ई-मेल: akash.sgm@gmail.com
संशोधन मार्गदर्शक:
प्रा. भूषण पटवर्धन
राष्ट्रीय प्राध्यापक शास्त्रज्ञ – आयुष
प्रतिष्ठित प्राध्यापक
आरोग्यशास्त्र विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे
ई-मेल: bpatwardhan@gmail.com
आणि
प्रा. कल्पना जोशी
विभाग प्रमुख
जैवतंत्रज्ञान विभाग
सिंहगड इंजिनीअरींग महाविद्यालय
पुणे
ई-मेल: kalpanajoshi1788@gmail.com

वार्तालेखक:
प्रा. डॉ. किरण ठाकूर
निवृत्त विभागप्रमुख
संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे
ई-मेल:g drkiranthakur@gmail.com
--

Ayurveda-based Herbal Drugs Prevent Side Effects of Chemotherapy in Cancer Treatment: A Pune Doctoral Research

 Ayurveda-based Herbal Drugs Prevent Side Effects of Chemotherapy in Cancer Treatment: A Pune Doctoral Research

Prof Dr. Kiran Thakur

Pune, Apr. 7, 2023- A Pune study on mice has recently established that Ayurveda-based herbal drugs, such as Ashwagandha (Withania somnifera) and Shatavari (Asparagus racemosus) have the potential to significantly prevent the side effects of chemotherapy. This study was doctoral research by Dr. Akash Saggam under the guidance of Prof. Bhushan Patwardhan, Prof. Kalpana Joshi, and Vaidya Girish Tillu at the School of Health Sciences, Savitribai Phule Pune University. It was carried out at Serum Institute of India under the supervision of Dr. Sunil Gairola and Dr. Manish Gautam.

The study was focused on myelosuppression that is the major side effect of chemotherapy. Myelosuppression is referred as incapability of bone marrow to produce white blood cells those are responsible for immunity. On the other hand, Ayurveda proposes use of Rasayana therapy that boosts immunity. Ashwagandha and Shatavari have such a potential to enhance immune response. The study by Dr Saggam and colleagues applied immunomodulatory effect of these herbs to prevent myelosuppression in mice.

Dr. Saggam used Paclitaxel drug as a representative of chemotherapy to cause myelosuppression and explored the efficacy of aqueous and hydroalcoholic extracts of Ashwagandha and Shatavari to prevent myelosuppression. He also observed that the signs of fatigue, pain, and hair-loss in mice due to paclitaxel were reduced by Ashwagandha and Shatavari. 

The five-year research project was sponsored by the Ministry of Ayush, Government of India. The results of this study are published in the journal- Frontiers in Pharmacology (https://doi.org/10.3389/fphar.2022.835616). This study also set an example of successful industry-academia consortium. 

Dr. Saggam in his interview highlighted the potential of Ayurveda to reduce side effects of chemotherapy. He stated, “This study generated scientific evidence to Rasayana concept that strengthens physiological homeostasis. However, there is a need of systematic clinical studies to test the effects in cancer patients”. Dr. Saggam’s core research area includes Molecular Immunology, Cancer Biology, Ayurveda, Integrative Medicine, and Computational Biology.

This research was in keeping with the global trend for a holistic and interdisciplinary approach for the treatment of the mankind.


Doctoral research by - 

Dr. Akash Saggam

Email: akash.sgm@gmail.com 


Research supervised by-

Prof. Bhushan Patwardhan

National Research Professor – Ayush

Distinguished Professor

Department of Health Sciences

Savitribai Phule Pune University

Pune

Email: bpatwardhan@gmail.com 



and


Prof. Kalpana Joshi

Professor and Head

Department of Biotechnology

Sinhgad College of Engineering

Pune

Email: kalpanajoshi1788@gmail.com 



The news feature authored by-

Prof. Dr. Kiran Thakur

Retired Head

Department of Communication and Journalism

Savitribai Phule Pune University

Pune

Email: drkiranthakur@gmail.com