tag:blogger.com,1999:blog-766105889389938966.post446034661143757289..comments2024-02-24T14:02:05.068+05:30Comments on Media Scene in India: Kiran Thakurhttp://www.blogger.com/profile/07236055000523884665noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-766105889389938966.post-24934353730210808572015-12-12T19:15:16.940+05:302015-12-12T19:15:16.940+05:30लेखकानं ना.गो. कालेलकर या विख्यात भाषावैज्ञानिकांच...लेखकानं ना.गो. कालेलकर या विख्यात भाषावैज्ञानिकांचे 'भाषा आणि जीवन' हे पुस्तक वाचल्यास कळेल की, शुद्ध-अशुद्धतेचा असा आग्रह हा 'अडाणीपणा' आहे. अडाणी हा शब्द कालेकरांनीच या संदर्भात वापरला आहे. वेगवेगळे शब्द वेगवेगळे अर्थ त्यांच्यासोबत आणत असतात, त्यामुळं कितीही शब्द 'बि'घडले तरी भाषेचं काहीच नुकसान होत नसतं. असं नुकसान होतं असं वाटणारेच भाषेचे मारेकरी असतात, कारण त्यांना भाषेचे प्रवाहीपण टाळून साचेबद्ध भाषा करायची असते. 'लोकं' शब्द शुद्ध व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा असेलही, पण 'कोसला' या मराठी कादंबरीतील मैलाच्या दगडात सर्वत्र 'लोकं' असाच तो लिहिला असेल तर तो लोकांनी स्वीकारलाय असा त्याचा अर्थ होतो. असे अनेक शब्द लोकांच्या स्वीकारण्यावरच आवश्यक की अनावश्यक हे ठरत असते, अर्थ आणि शब्द यांचे अर्थाअर्थी काही नाते नसते, तसे ते लावणे भाषेला मारक ठरणारे आहे. 'दर्शक' म्हणजे दाखवणारा, पण 'दूरदर्शन'मुळे 'आपले दर्शक'मधील 'दर्शक' हा शब्द प्रेक्षक या अर्थ आता रूढ झालेला आहे, त्यात चूक असे काही नसते. बेकार-बेरोजगार, बोगस-बनावट-- इत्यादी उदाहरणे तर फारच बनावट आहेत, कारण बहुसंख्य मराठी बहुजनांनी स्वीकारलेल्या शब्दावर लेखकाचा आक्षेप असल्याचे त्यातून दिसते. भाषा बहुजनांच्या अर्थांनी चालत असते. अन्यथा ती रांगूही शकणार नाही. असो.Anonymousnoreply@blogger.com